अहिल्याबाईंनी तीस वर्षे राज्य तर सांभाळलेच पण अनेक राज्यात सुंदर वास्तू उभारून देशाचे सौंदर्य
वाढवले आणि जनतेच्या हिताची कामे करून फार मोठे जनहित साधले. इतर राजांना स्फूर्तो दिली. त्यांचा आदर्श पुढे ठेवून अनेक सत्तांधारी दानाला महत्त्व देऊ लागले. त्यांनी सत्ताधाऱ्यांपुढे एक आदर्श ठेवला.
अहिल्याबाई नेहेमी म्हणत स्नानाने देहशुद्धी, ध्यानाने मनशुद्धी आणि दानाने धनशुद्धी होते. आपल्या संस्कृतीतही त्याग आणि दानधर्म याला फार महत्त्व आहे. आपली संस्कृती भोगापेक्षा त्यागावर उभी आहे. सर्वांमध्ये देवाचा अंश आहे असे मानून प्राणीमात्रांना सुख देणे, सेवा करणे, मदत करणे हाही भक्तिचाच प्रकार मानलेला आहे.
अहिल्याबाईंचे सारे जीवन त्याग आणि सेवा यासाठीच होते असे म्हटले तर त्यात काही चूक नाही. त्याग आणि सेवा हा त्या ईश्वरभक्तिचाच प्रकार मानीत असत. त्यांचे कार्यक्षेत्र फक्त त्यांची प्रजा वा राज्य इतकेच नव्हते तर संपूर्ण मानव समाजापर्यंत ते विस्तारले होते. आज आपण सर्वधर्मसमभाव जो म्हणतो तो अहिल्यादेबींनी दोनशे वर्षांपूर्वी कृतीत आणला होता. त्यांच्या प्रेमाला, मायेला, वात्सल्याला आणि दानधर्मालाही जातीधर्माच्या सोमा कधीच नव्हत्या. आपल्या कर्तव्याचे पालन करणे हाच त्यांचा महान कर्मयोग होता. हेच त्यांचे कल्याणाचे मर्म होते.
त्यांनी आपली खाजगी संपत्ती दानधर्मात आणि अनेक देवळे घाट बांधण्यात खर्च केली याचंही कारण त्यांना पारलौकिक सुख हवे होते असे नाही तर प्रजेला सुखी करायचे होते. त्यांनी या दानाचा कधीच गाजावाजा केला नाही की समारंभ करून कौतुक करून घेतले नाही.आतापर्यंत मिळालेली माहिती पुढे आहे-
१) त्र्यंबकेश्वर : नाशिक या शहरापासून १८ मैलांवर हे बारा ज्योतिलिंगापैकी एक आहे. इथे कुशावर्त नावाचे कुंड आहे. अतिशय सुंदर असे दगडी मंदिर आहे. इथे अहिल्याबाईंनी विहिर, धर्मशाळा बांधली.
२) नंदुबार : इथे विहिर खोदली. ती आजही अहिल्याबाई विहिर म्हणून ओळखतात.
३) नाशिक : येथे श्रीराम मंदिर बांधले आहे. त्यांचे बांधकाम मजबूत आहे.
४) अयोध्या : येथे एक राममंदिर बांधले आहे.
५) उज्जयिनी : येथे चिंतामणी गणपती मंदिर बांधले आणि महाकालेश्वराच्या पूजेची व्यवस्था करून ठेवली.
६) ओंकार : अहिल्याबाईंच्या सासूबाई गौतमाबाई यांनी बांधकाम सुरू केले होते. ते गौरी सोमनाथ मंदिर अहिल्याबाईंनी पूर्ण केले. अंमलेश्वर मंदिर बांधले. एक बाग करून त्यात छत्री उभारली.
७) कर्नाटक : गरीब लोकांच्या सहाय्यासाठी काही रक्कम उभारून ठेवली.
८) काशी : सुप्रसिद्ध मनकर्णिका घाट ऑक्टोबर १७८५ मध्ये बांधला. त्या कामासाठी २५००० रुपये खर्च आला होता. त्याच वर्षी तेथे दशाधमेध घाट बांधला. काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करवला. गौतमेश्वर आणि अहिल्योद्धारकेश्वर ही विशाल मंदिरे उभारली.
९) कुरुक्षेत्र : घाट आणि मंदिर बांधले.
१०) केदारनाथ : एक धर्मशाळा बांधली. जमिनीपासून सुमारे तीनशे फूट उंचीवर पाण्याचे एक सुंदर कुंड बांधले. त्यामुळे यात्रेकरूंची खूप सोय झाली.
११) कोल्हापूर : अंबाबाईच्या पूजेसाठी व्यवस्था करून ठेवली.
१२) गंगोत्री : येथे विश्वनाथ, केदारनाथ, भैरव, अननपूर्णा अशी चार मंदिरे बांधली. यात्रेकरूंसाठी सहा चिरेबंद धर्मशाळा बांधल्या. शिवाय पर्वतावर उंच ठिकाणी विश्रामस्थाने बांधली.
१३) अमर्कटक : इथे अहिल्याबाईंनी धर्मशाळा बांधली आहे.
१४) आनंद कानन : येथील विश्वेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा जीर्णोद्धार केला.
१५) आलमपूर : इथे मल्हारणवांचा देहांत झाला होता. तेथे हरिहरेश्वराचे मंदिर बांधले. मल्हाररावांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुंदर छत्री उभारून, छत्रीसमोर खंडेराव मार्तंडाचे मंदिर उभारले. एक
सदावर्त चालू केले.
१६) गया : विष्णूमंदिराचा जीर्णोद्धार केला.
१७) चिखलदरा : नर्मदेची परिक्रमा करणाऱ्यांसाठी एक अन्नछत्र ठेवले होते.
१८) चौंडी चापडगाव : येथे महादेवाचे मंदिर आणि एक घाट बांधला. मंदिराचे नाव अहिल्येश्वर आहे. त्याच्या खर्चासाठी वार्षिक आठशे रुपये इंदूर राज्यातून दिले जातात. हे अहिल्यादेवींचे जन्मगाव!’
१९) जगनाधपुरी : मुख्य मंदिरातील पूजेसाठी मंदिरास काही गावे धर्मादाय देऊन टाकली.
२०) जांब गाव : रामदास स्वामींच्या मठास मदत केली.
२१) जामघाट : एक सुंदर महाद्वार बांधले.
२२) चांदवड : येथे सुंदर महाल बांधला असून तिथे त्यांची टांकसाळ होती.
२३) जेजुरी :मार्तडाचे मंदिर बांधले.
२४) ताना : येथे तिळभांडेशवराचे मंदिर बांधले.
२५) देवप्रयाग : हे स्थान हिमालयात गंगोत्रीच्या वाटेवर आहे. येथे अलकनंदा नावाची नदी गंगेला मिळाली आहे. तिथे अहिल्यादेवींचे एक सदावर्त आहे.
२६) द्वारका : पुजाअर्चा करण्यासाठी काही गावे दान दिली आहेत.
२७) दारुकवन : नागेश्वरातील देवतेच्या पूजेची कायम व्यवस्था केलेली आहे.
२८) नाथद्वारा : एक धर्मशाळा बांधली आहे.
२९) निफाड : निफाड ते दिंडोशी रस्त्यावर पाण्याचे कुंड तयार करविले.
३०) नीलकंठ महादेव : याच नावांचे सुंदर मंदिर बांधले. एक गोमुख तयार केले आहे.
३१) परळी : येंथील परळी वैजनाथ देवळाचा जीर्णोद्धार केला.
३२) पंढरपूर : श्रीराम मंदिर बांधले. होळकरवाडा आणि घाट बांधला
३३) प्रयाग : मोठा विशाल घाट बांधला.
३४) पुष्कर : एक मंदिर आणि धर्मशाळा बांधली.
३५) पैठण : येंथे यात्रेकरूंसाठी अन्नछत्र सुरू केले.
३६) पुणतांबे : एक वाडा बांधला. एक घाट आहे.
३७) बद्रीनारायण : श्रीहरीचे मंदिर बांधले. धर्मशाळा बांधून अनेक कुंडे तयार केली. देवीच्या नावाने एक सदावर्त चालू केले.
३८) बिदूर : ब्रह्माघाट बनवला.
३९) मंडलेश्वर : खरगोण जिल्ह्यात नर्मदाकाठी हे नगर आहे. येथे देवींनी एक घाट आणि मंदिर बांधले.
४०) मथुरा : येथे चिरबंद धर्मशाळा बांधल्या:
४९) महेधर : ही अहिल्यादेवींची राजधानी होती. इथे अप्रतिम घाट आहेत. डौलदार मंदिरे आहेत; सदावर्ते आहेत. हातमाग आहेत. तिथे अजूनही ‘कामे चालू आहेत. अहिल्यादेवींचा वाडा; देवघर, त्यांची दरबाराची जागा सर्व पाहता येते.
४२) रामेश्वर : एक धर्मशाळा असून अनछत्र आहे.
४३) रावेर : येथे पाण्याचे कुंड आहे.
४४) वृंदावन : अन्नछत्र स्थापन केले. लाल दगडांची एक विहिर बांधली.
४५) वेरूळ : गौतमाबाईंनी बांधलेल्या पृष्णेश्वंर मंदिराचा जीर्णोद्धार केला, पाण्यासाठी एक कुंड तयार केले.
४६) श्री शैल : मल्लिकार्जुन शिवमंदिर बांधले.
४७) संगमनेर : येथे राममंदिर बांधून घेतले.
४८) सातारा : विहिर बांधली.
४९) सप्तशृंगगड :एक धर्मशाळा बांधलेली आहे.
५०) सुलपेश्वर : अन्नछत्र स्थापन केले. या ठिकाणी प्रवाशास एक घोंगडी आणि तांब्या दिला जात असे.
५१) सोमनाथ : सोममनाथंचे महादेव मंदिर इंतिहास प्रसिद्ध आहे. १०२४ मध्ये महंमदगझनीने. स्वारी करून याची मोडतोड केली होती.अहिल्यादेवींनी या मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली.
५२) हरिद्वार : या ठिकाणी पश्चिमोत्तर दिशेला कुशावर्त, हरकी पेडीच्या दक्षिणेस गंगेकाठी घाट आहे. या घाटावर अहिल्यादेवींनी विशाल धर्मशाळा बांधली.
५३) हंदिया : इथे अहिल्यादेवींनो एक धर्मशाळा बांधली. अन्नछत्र कायमचे सुरू केले. ६०-७० फुटांचे सिद्धनाथ मंदिर बांधले. विशाल घाट बांधला.
याशिवाय कित्येक ठिकाणी विहिरी, धर्मशाळा बांधल्या. अन्नछत्रे उभी केलो. देवालयांचे जीर्णोद्धार केले.
अन्नछत्रे, विहिरी, धर्मशाळा बांधण्यामागे त्यांचा सामाजिक दृष्टिकोन होता. अन्न, पाणी आणि निवारा या
माणसांच्या प्रमुख गरजा पुरविण्यासाठी त्यांनी केलेली ही प्रचंड धंडपड होती.
प्रत्येक कार्यासाठी स्वतंत्र अर्थव्यवस्था असल्यामुळे पुढे राज्यकर्ते बदलले तरी कुणालाही पदर पसरत मदत मागायला यावे लागले नाही. व्यवस्था सुरळित चालत राहिली. त्यांची नि:स्वार्थ सेवा मानवतेला वाहिलेली होती. जातिधर्मांच्या सीमा ओलांडून जाणारी होती.
कला आणि साहित्य याकडे सुद्धा त्यांचे लक्ष होते. त्यांनी उभ्या केलेल्या वास्तू, घाट अत्यंत कलात्मक आहेत.
संदर्भ : महाराष्टाचे शिल्पकार तेजस्विनी अहिल्याबाई होळकर,महाराष्ट राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई.